वरदवाणी (३)🚩
हिंदू धर्म समजून घ्या - ३.
रमणमहर्षीच्या
दर्शनाला कोणी गेले की ते म्हणत - नो दायसेल्फ (Know thyself) तू
स्वतःला समजून घे.
खरोखरीच सगळ्या
आपत्तीचे, सगळ्या संघर्षाचे, सगळ्या कामक्रोधाचे मूळ या 'मी'
च्या
अज्ञानामध्ये आहे. हे समजून घेणे व्यक्तीच्या पातळीवर जेवढे आवश्यक आहे तेवढेच
समष्टीच्या पातळीवरही आवश्यक आहे, राष्ट्राच्या पातळीवरही आवश्यक आहे. अत्यंत
प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही हिंदू अजूनही बहुसंख्य आहोत याचे कारण काय, ते
समजून घेतलेच पाहिजे, हिंदूच्या वर आपत्ती आल्या त्या शिकंदरच्या काळानंतर, त्याआधी
हिंदू साम्राज्यात सोन्याचा धूर निघत होता असे इतिहास सांगतो. पण शिकंदरच्या मागे
जाऊन विचार करण्याची आवश्यकताच वाटत नाही की जो भारतीय सीमेच्या आत फारच थोडा
प्रवेश करु शकला. आज हे सगळे सांगायची काही आवश्यकता नाही. सुदैवाने शासनाला सद्बुध्दी
सुचली आणि दूरदर्शनवर 'चाणक्य' दाखविले जाते त्यातून यासंबंधीची माहिती सर्वांना मिळते आहे.
मी एका
अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांना विचारले होते की, तुम्ही
चाणक्याचे अर्थशास्त्र, आणि शुक्रनीती वाचले आहे का ? त्या
प्राध्यापकांनीच मला विचारले 'चाणक्य ही काय भानगड आहे ?' मी
कपाळाला हात लावला. त्या प्राध्यापकांनी, आपला जो विषय आहे, त्याच मूलभूत
ज्ञान करुन ध्यायला हवे. की, पगारवाढीकरता नुसते संपावर जावे? प्राध्यापकालाच
एखाद्या विषयाची सखोल माहिती नसल तर विद्यार्थ्याला ती कशी असणार? आडातच
नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?
मी हे सांगत होतो,
एवढ्यासाठी
की प्रदीर्घ कालानंतरही आम्ही जसेच्या तसे टिकून आहोत, बहुसंख्येने
जिवंत आहोत हे महत्वाचे आहे की नाही?
(क्रमशः)
प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती
No comments:
Post a Comment