भारतीयदर्शन-परिचय : अद्वैत वेदांत (भाग१)
सदाशिव समारंभात्।
शंकराचार्य मध्यमात्।
अस्मद आचार्य पर्यंतं।
वन्दे गुरुपरंपराम्।
इसवीसनपूर्व सहाव्या शतकात भ.गौतम बुद्धांनी यज्ञहिंसेचा त्याग करून भारतीयांना नवा मार्ग दिला.
सम्राट अशोक,अजातशत्रू आदी राजांच्या राजाश्रयामुळे बौद्धमताचा प्रचार भारतात,भारताबाहेर सर्वत्र वेगाने झाला.
परन्तु,, जसा गणेशोत्सव विशिष्ट हेतूने सुरू झाला तरी सध्या त्याचे अनेकतोंडी रूप झाले आहे,तसे काहीसे या विप्लवात घडले.समाजाची घडी विस्कळीत झाली."इंन्द्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा"या प्रमाणे वेदांविरुद्धच्या बंडात याच रचनेच्या आधारे उभा असणारा सामाजिक जीवनाचा पाया खिळखिळा होऊ लागला.साधारणपणे पहिल्या शतकापासून लोकांमध्ये पुन्हा वेदांकडे जाण्याचा कल वाढू लागला.
पहिल्या शतकात जेमिनी यांनी मिमांसासूत्रे रचली.वेदांच्या कर्मकांडातील म्हणजे,संहिता आणि ब्राह्मणे यांमधील वचनांचा समन्वय करणारे शास्त्र निर्माण झाले!
वेद वचनांमधील अंतर्विरोध नाहीसा करून श्रुती,स्मृती,पुराणोक्त विधींची रचना लावण्यात आली.त्या आधारे समाजातील वेदनिष्ठा वृद्धिंगत केली गेली.ही परंपरा आठव्या शतकापर्यंत सुरू होती.
वार्तिके,भाष्ये,अर्थशास्त्र,स्मृति,पुराणे यांच्या रचना झाल्या.चंद्रगुप्त, चाणक्य,विक्रमादित्य, शालिवाहन, हर्षवर्धन ,पुलकेशी या यशस्वी राजांचा हा कालखंड !!
ग्रीक हुण शक यांच्या आक्रमणांना परतावून लावून भारतात सुवर्णयुग रचले गेले !!
आठवे शतक उजाडले!!ज्यांचे मिमांसासूत्रांवरील मत भाट्टमत म्हणून सर्वत्र स्वीकारले जात होते,अशा कुमारिल भट्टांच्या कुळात त्यांच्या पुतण्याने,बौद्धमत म्हणजेच नास्तिक धर्म(वेद मान्यता नसणारा)स्वीकारला!
त्याचे नाव धर्मकीर्ती..कुमारिल भट्ट रागावले!रागावलेल्या आपल्या चुलत्याला त्याने सांगितले ''निषेध्य बोधाद्धी निषेध्य बाध''असेच म्हणतात ना मिमांसेत. मग खंडन करण्याआधी त्या मताचे पूर्ण ज्ञान मिळवा.
वयाच्या चौथ्या दशेत कुमारिल ज्ञान मिळवण्यासाठी सिद्ध झाले!त्यांनी नालंदा ज्ञानपीठातील मुख्य आचार्य धर्मपाल यांचे शिष्यत्व पत्करले.अटीनुसार ते बौद्ध झाले!तेथे अभ्यासा बरोबरीने चालणारी वेदनिंदा ऐकून त्यांचे मन विदीर्ण होत असे.
कोणता पंथ श्रेष्ठ हे त्या काळात शास्त्रार्थ करून ठरत असे.
शिक्षण पूर्ण झाल्यावर विशाल सभेचे आयोजन करण्यात आले.ठरल्याप्रमाणे वाद झाला.कुमारिलांच्या प्रतिभेमुळे त्यांचा विजय झाला.बौद्ध आचार्य धर्मपाल पराभूत झाले.
मात्र धर्मपाल यांची मती बुद्ध,धम्म आणि संघापासून ढळली नाही.त्यांनी परमत न स्वीकारता प्राणत्याग केला.
नंतर कुमारिलांनी अनेक ठिकाणी शास्त्रार्थ केले व विजय मिळवले!
मात्र आपल्या बौद्ध गुरूंना आपल्यामुळे जीवनाश करावा लागला आणि काही काळ आपण ईश्वर व वेदांना नाकारले या दोन दोषांचे प्राय:श्चित्त म्हणून त्यांनी तुषानलात प्रवेश करण्याचे ठरवले.
सर्व बाजुंनी तांदळाच्या कोंड्याचा ढीग करून त्यात वृद्ध कुमारिल भट्ट यांनी प्रवेश केला.अग्नी पेटवण्यात आला.
त्याचवेळी एक तेजस्वी यती तेथे आला.तो आचार्यांना म्हणाला,''हे पंडिताग्रणी ,अद्वैत सिद्धांताच्या प्रचारासाठी मी प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहिली आहेत.आपण अद्वैत मत स्वीकारून या भाष्यांचे वार्तिक लिहावे ही विंनती करण्यासाठी मी येथे आलो आहे•।माझ्या कमंडलूतील जलाचे सिंचन करून हा अग्नी क्षणात शांत करतो"
(प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसुत्रे,गीता,उपनिषदे,
आणि वार्तिक म्हणजे खंडनमंडनात्मक स्पष्टीकरण)
त्यावर कुमारिल शांतपणे म्हणाले,"हे यतीराज,हा तुषानलप्रवेश वेदोक्तव्रताचा परिपाक आहे!मला गुरुहत्येचे आणि पथभ्रष्टतेचे प्राय:श्चित्त घेऊ द्या!आपण माझा शिष्य मंडनमिश्र याचेकडे जावे.तो माझ्यापेक्षा कशातच उणा नाही!आपण माझ्यासाठी तारक ब्रह्माचे नामोच्चार करावे!आता अग्नी वाढत आहे.""
एक आदर्श सनातनी महापुरुष सत्यपालनासाठी आत्मसमर्पण करत होता!अखेरीस अग्नी आतून पेटत गेला व गंभीरपणे तारकब्रह्म नामोच्चार ऐकत कुमारिलांचा जीव शरीर सोडून गेला...!
आणि तो तरुण यती,आचार्य शंकर ; मंडनमिश्र यांच्याकडे जाण्यासाठी निघाला..प्रस्थानत्रयी वरील भाष्ये घेऊन!!
(क्रमशः)
डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.
No comments:
Post a Comment